Sports Featureक्रीडा

केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली ते अश्विनने रचला इतिहास.. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे 12 विक्रम, भारतीय संघाच्या खेळाडूंनी मोडले दिग्गजांचे विक्रम..

केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली ते अश्विनने रचला इतिहास.. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे 12 विक्रम, भारतीय संघाच्या खेळाडूंनी मोडले दिग्गजांचे विक्रम..


आज शेर-ए-बांगला मैदानावर भारताने बांगलादेश संघाचा तीन गडी राखून पराभव केला आणि या कसोटी मालिकेत बांगलादेशचा क्लीन स्वीप केला. भारताने ही मालिका 2-0 अशी खिशात घातली. भारताने यापूर्वी एकदिवसीय मालिका गमावली होती.

बांगलादेशकडून मेहंदी हसनने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले आणि भारताकडून दुसऱ्या डावात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने 62 चेंडूत 42 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 12 ऐतिहासिक विक्रम, या विक्रमांवर एक नजर टाकूया.

1. या दुसऱ्या कसोटीत केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

2. बांगलादेशविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाज जयदेवने 12 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तसेच या कसोटीत त्याने एक विकेट देखील घेतली.

3. रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 449 विकेट्स तसेच 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीत 3000 धावा आणि 400 हून अधिक विकेट्स पूर्ण करण्यापर्यंत, तो जगातील सर्वात कमी डावात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

4. नजमुल शांतोने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.

5. चेतेश्वर पुजाराने या कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 7000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 8वा भारतीय खेळाडू ठरला.

6. श्रेयस अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले.

7. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू नुरुल हसनने कसोटी क्रिकेटमध्ये 50 चौकार पूर्ण केले.

8. शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 बळींचा टप्पा पार केला.

9. भारताने 12 कसोटी सामन्यांनंतर पहिल्या डावात प्रथम फलंदाजी केली. शेवटच्या वेळी त्याने ऑगस्ट 2021 मध्ये हे केले होते.

10. केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली.

11. श्रेयस अय्यरने मागील 12 डावांमध्ये 650 हून अधिक धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० च्या वर आहे.

केएल राहुल

12. चौथ्या डावात भारतासाठी 7/ 8 व्या क्रमाकांच्या खेळाडूंची सर्वात मोठी पार्टनरशिप

74  एल अमर सिंग – लाल सिंग वि. इंग्लंड

71* एस अय्यर – आर अश्विन विरुद्ध बांगलादेश, आज

70 कपिल देव – एल शिवरामकृष्णन विरुद्ध श्रीलंका.


हेही वाचा:

‘अश्विन अण्णा अंगार है, बाकी सब..’ हरत असलेल्या सामना अश्विन,श्रेयसने बांग्लादेशच्या हातातून हिसकावला तर सोशल मिडीयावर चाहते झाले भलतेच खुश, सोशल मिडियावर होतंय कौतुक, पहा व्हिडीओ.

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

“मला आशा होती की कमीत कमी आता तरी” बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा जागा न मिळाल्यामुळे नाराज झाला हा स्टार खेळाडू, सोशल मिडियावर जगजाहीर केली आपली नाराजी..!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,