सध्या टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली IND VS ENG कसोटी मालिका खेळली जात आहे आणि या कसोटी मालिकेत टीम इंडियाने इंग्लंड संघावर 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आज 7 मार्चपासून धर्मशालाच्या मैदानावर IND VS ENG मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना खेळला जात आहे.
टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी IND VS ENG मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे आणि ही कामगिरी पाहून आता व्यवस्थापन या खेळाडूंना पुन्हा टीम इंडियामध्ये संधी देणार नसल्याचे बोलले जात आहे. यांची कसोटी कारकीर्द या सामन्यानंतर जवळपास संपल्यात जमा होणार आहे, हे मात्र नक्की. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू..?
IND vs ENG: या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळणार नाही,संघातून हकालपट्टी निच्छित.
के एस भरत
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हा टीम इंडियाचा मुख्य यष्टीरक्षक फलंदाज होता. पण टीम इंडियासाठी तो कधीही आश्वासक कामगिरी करू शकला नाही. या मालिकेत टीम इंडियासाठी पहिल्या दोन सामन्यांपैकी केएस भरतने प्लेइंग 11 मध्ये आपली जागा निश्चित केली होती, पण यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने टीम इंडियासाठी फारशी कामगिरी केलेली नाही. या मालिकेत केएस भरतने टीम इंडियासाठी खेळलेल्या 2 सामन्यांच्या 4 डावात 23 च्या सरासरीने 92 धावा केल्या आहेत.
मुकेश कुमार
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला IND VS ENG मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात व्यवस्थापनाने प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले होते, परंतु त्या सामन्यात त्याने टीम इंडियासाठी काही खास कामगिरी केली नाही. या सामन्यात त्याने टी-20 सामन्याप्रमाणे धावा दिल्या आणि विकेट घेण्यातही सपशेल अपयशी ठरला. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात मुकेश कुमारने टीम इंडियासाठी 12 षटके टाकली आणि 5.83 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत फक्त 1 बळी घेतला.
रजत पाटीदार
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदारचा BCCI ने IND VS ENG मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघात समावेश केला होता आणि त्याला विराट कोहलीच्या फलंदाजीच्या स्थितीवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु प्रत्येक डावातील त्याच्या कामगिरीने सर्वांची निराशा केली आहे आणि तो IND VS ENG मालिकेत टीम इंडियासाठी कमकुवत दुवा म्हणून उदयास आला आहे.
रजत पाटीदारची ही कामगिरी पाहिल्यानंतर त्याला आगामी मालिकेत टीम इंडियात संधी मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. राजती पाटीदारने या मालिकेत खेळल्या गेलेल्या 6 डावांमध्ये 10.32 च्या सरासरीने केवळ 63 धावा केल्या आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- IND vs ENG: टीम इंडियाच्या ची नजर 112 वर्ष जुन्या विक्रमाकडे, धर्मशाला कसोटी सामना जिंकताच भारतीय संघाची नावी मोठा विक्रमाची नोंद.
- WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.
- ‘फिफ्टी आणि सेंच्युरी म्हणजे टाइमपास करणे’, हार्दिक पांड्याने दिली या दिग्गज खेळाडूंना खुन्नस.