क्रीडा

‘ देर आए दुरुस्त आए..’ BCCI ने केएल राहुलच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) रविवारी,ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये. मात्र बीसीसीआयने केएल राहुलच्या बाबतीत टोकाचं पाऊल उचललं आहे.

उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी केएल राहुलला संधी दिली गेली आहे. मात्र त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला ही जबाबदारी दिली गेली होती. मात्र आता ही जबाबदारी काढून घेण्यात अली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केएल राहुल सतत फ्लॉप ठरतोय. त्याला संधी मिळतेय मात्र तो धावा करण्यात अपयशी ठरतोय.

त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता बीसीसीआयने मोठी भूमिका घेतल्यानंतर लवकरच शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरू असलेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ ३८ धावा करता आल्या आहेत.

के एल राहुल
Photo courtesy : bcci/Twitter

कसोटी क्रिकेटमध्ये एक वर्षापासून एकही अर्धशतक नाही..

केएल राहुलने गेल्या एक वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक किंवा अर्धशतक झळकावले नाहीये. त्याने शेवटचे अर्धशतक जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या मालिकेत झळकावले होते. आतापर्यंत त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये २६४२ धावा केल्या आहेत.

हे ही वाचा..

अखेर, 5 वर्षांनंतर हे 3 खेळाडू पुन्हा दिसू शकतील 2023 च्या आईपीएल मध्ये, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,