क्रीडा

अंडर -१९ विश्वविजेत्या भारतीय संघावर होणार बक्षिसांचा वर्षाव! BCCI देणार इतक्या कोटींची बक्षिसे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अंडर -१९ महिला टी -२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघाने रविवारी झालेल्या आयसीसी अंडर -१९ महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला धूळ चारत इतिहास रचला आहे. जे वरिष्ठ संघातील खेळाडू करण्यास अपयशी ठरत होते. ते भारतीय महिला संघातील युवा खेळाडूंनी करून दाखवलं आहे.

हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर जय शाह यांनी ट्विट करत संघाचे कौतुक केले. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “भारतात महिला क्रिकेट देखील पुढे जात आहे. विश्वचषकाच्या विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. बक्षीस म्हणून संपूर्ण संघासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांची घोषणा करताना मला आनंद होत आहे.”


आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळणं ही कुठल्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. तसेच खेळाडू दबावात देखील असतात. मात्र भारतीय संघातील महिला खेळाडूंनी कुठलाही दबाव न घेता विजय मिळवला. त्यामुळे जय शाह यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच एका दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी विजेत्या संघातील खेळाडूंना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या मैदानावर होणारा तिसरा टी -२० सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

जय शाह यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, “मी शेफाली वर्मा आणि विजयी संघाला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आम्हाला भेटण्यासाठी आणि तिसरा टी -२० सामना पाहण्यासाठी आमंत्रित करतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button