- Advertisement -

Border Gavaskar Trophy: सामनावीर ठरला तरीही आयसीसीने रवींद्र जडेजाला ठोठावला तब्बल एवढा दंड, गोलंदाजी दरम्यान जडेजाने केले होते असे कृत्य..

0 0

Border Gavaskar Trophy: सामनावीर ठरला तरीही आयसीसीने रवींद्र जडेजाला ठोठावला तब्बल एवढा दंड, गोलंदाजी दरम्यान जडेजाने केले होते असे कृत्य..


 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border Gavaskar Trophy) च्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याला आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जाडेजा गोलंदाजी करताना बोटांना क्रीम लावताना दिसला. आता त्याला हीच कृती महाग पडली आहे. आयसीसीकडून त्याची 25 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. जाडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय ही क्रीम लावल्यामुळे असं करण्यात आलं आहे. यासोबतच जाडेजाला डिमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे.

ऑस्ट्रोलीया

या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की त्या लिहिलं आहे की, ‘रवींद्र जाडेजा ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे. यासोबतच जाडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एका डिमेरिट पॉईंटचीही भर पडली आहे. 24 महिन्यांच्या कालावधीतील त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.’

नेमकं काय घडलं होतं?

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी जाडेजाने बोटांना क्रीम लावल्याची ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 46 व्या ओव्हरमध्ये घडली होती. जाडेजाने मोहम्मद सिराजच्या हातातून क्रीम काढून बोटांवर लावली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंपासून ते मीडिया आणि चाहत्यांनी साऱ्यांनीच जाडेजावर टीका केली होती.

रवींद्र जडेजा

अशाप्रकारे त्याचा क्रीम लावण्याचा संबंध बॉल टेम्परिंगशी जोडला जात होता. यावर मॅच रेफरीनेही जाडेजाला प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगितले होते की हे क्रीम बोटांवर वैद्यकीय कारणासाठी म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी लावली होती. जाडेजाच्या उत्तराने पंचांचे समाधान झाले. यासोबतच बोटांवर क्रीम लावल्याने चेंडूच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचेही स्पष्ट झाले. पण पंचाची परवानगी घेतली नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी

नागपूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 177 धावांत गुंडाळले, प्रत्युत्तरात भारतीय संघाने त्यांच्या डावात 400 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांत आटोपला. अशा प्रकारे भारताने आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा:

VIRAL VIDEO: मोहम्मद शमीने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, स्टंप उडून पडले लांब पाहून नाथन लायनचे उडाले होश, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..

.न्यूझीलंड पोहोचताच रस्त्यावर फिरायला लागले भारतीय खेळाडू, यजुवेन्द्र चहलने शेअर केलेले फोटो होताहेत व्हायरल..

या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..

Leave A Reply

Your email address will not be published.