क्रीडा

आधी नोकरी मिळत नव्हती ,आता बायकोने केली केस.. क्रिकेटपटू ‘विनोद कांबळी’ पुन्हा अडचणीत पत्नीने दारू पिऊन मारत असल्याची केली तक्रार.

 माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा अडचणीत..! आधी नोकरी नव्हती आता पत्नीनेच केली पोलिसांत तक्रार, समो आले धक्कादायक कारण..


माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी पत्नी अँड्रिया त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. अँड्रियाच्या तक्रारीवरून मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात कांबळीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कांबळीने तिला शिवीगाळ केल्याचे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर दारूच्या नशेत त्याने पत्नीलाही मारहाण केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinod Kambli (@vinodkambli2016)

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळी विरुद्ध आयपीसी कलम ३२४ (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) आणि ५०४ (अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कांबळीवर मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाच्या पॅनच्या हँडलने पत्नीला मारल्याचा आरोप आहे. त्याने तवा पत्नीच्या अंगावर फेकला. यामुळे अँड्रियाला दुखापत झाली. यानंतर त्याने पत्नीलाही बॅटने मारले.

I am surviving on the pension given by BCCI," Vinod Kambli reveals he is desperate for some work in cricket as he has no source of income

दारूच्या नशेत कांबळीने मुलाला शिवीगाळ केली.

कांबळी रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला. त्याने केवळ पत्नीलाच मारहाण केली नाही, तर त्याच्या मुलालाही शिवीगाळ केली. 12 वर्षाच्या मुलाने कांबळीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो मान्य झाला नाही. मुलाला शिवीगाळ करून नंतर पत्नीला मारहाण केली. मात्र, हे प्रकरण मिटवले जात असल्याचे आंद्रियाने म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या घटनेनंतर अँड्रिया प्रथम भाभा रुग्णालयात गेली. त्यानंतर तिने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि एफआयआर नोंदविला.

विनोद कांबळी

विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने एकूण 3,561 धावा केल्या. यामध्ये एकूण सहा शतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत चार शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली.

1991 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कांबळीने अवघ्या नऊ वर्षात आपली कारकीर्द संपवली. त्याने शेवटचा सामना 2000 मध्ये खेळला, तर त्याचा सहकारी सचिन 24 वर्षे देशासाठी खेळला आणि अनेक विक्रम रचले.


हे ही वाचा:-

ते तीन भारतीय फलंदाज ज्यांना जगातील कोणताच गोलंदाज बाद करू शकला नाही, हा खेळाडू तर सलग 5 वेळा 

हे 5 वेगवान गोलंदाज मोडू शकतात शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम, भारताचा हा गोलंदाज हा विक्रम मोडण्याचा प्रबळ दावेदार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button