- Advertisement -

शतक केल्यानंतरही या भारतीय खेळाडूला प्लेइंग इलेवन मधून बाहेर काढले होते. जाणून घ्या कोण होता तो खेळाडू.

0 0

भारतीय संघाच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असा एक खेळाडू आहे. ज्याला शतक झळकावल्यानंतरही भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. आज आम्ही तुम्हाला या खास लेखात भारतीय संघातील त्या खेळाडूबद्दल सांगणार आहोत.

मनोज तिवारी तो खेळाडू आहे. ज्याला शतक झळकावूनही भारतीय संघातून वगळण्यात आले. मनोज तिवारीने 2011 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले होते.

त्याने 11 डिसेंबर 2011 रोजी चेन्नईच्या चपाक क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 126 चेंडूत 104 धावांचे नाबाद शतक झळकावले, परंतु त्याचे शतक असूनही त्याला टीममधून बाहेर केले.


ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन मालिकेतही त्याचा संघात समावेश होता. त्याचवेळी त्याला आशिया कप 2012 मध्येही स्थान मिळाले. त्याच वेळी, 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, त्याला भारताच्या 15 सदस्यीय संघात देखील घेण्यात आले होते, परंतु यादरम्यान भारताने एकूण 14 एकदिवसीय सामने खेळले, परंतु त्याला एकही सामन्यात प्लेइंग इलेवन मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

यानंतर डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला तेव्हा मनोज तिवारीची त्या संघात निवड झाली नव्हती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच, त्याचे नाव यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषक 2012 च्या संघात नव्हते.

परंतु नंतर तो अनेकवेळा भारतीय संघात परतला, परंतु भारतीय संघात त्याला नियमितपणे स्थान मिळवता आले नाही. तो भारतीय संघासाठी एकूण 12 एकदिवसीय सामने खेळला. ज्यात त्याने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या. त्याने भारतासाठी 3 टी-20 सामनेही खेळले.

या सर्व माहितीवरून तुम्हाला काय वाटते? मनोज तिवारी या खेळाडू वरती अन्याय झाला आहे का? कारण सगळ्याच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनसुद्धा संघात खेळण्याची भेटत नसेल तर यामध्ये चूक त्या खेळाडूची कि अन्य कोणाची.

Leave A Reply

Your email address will not be published.