Harmanpreet Kaur Angry on Team: भारतीय महिला क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ 16.2 षटकांत केवळ 80 धावा करून सर्वबाद झाला. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 11.2 षटकात 4 गडी गमावून 82 धावा करत सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडीही घेतली आहे. हरमनप्रीतने या पराभवासाठी फलंदाजाना जबाबदार धरत मोठे वक्तव्य केले आहे.
Harmanpreet Kaur Angry on Team: या पराभवासाठी फलंदाज जबाबदार- हरमनप्रीत कौर
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दुसऱ्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा यासाठी फलंदाजांना जबाबदार धरले आणि म्हटले की, तिचे फलंदाज चेंडूचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत. नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ८० धावांवरच मर्यादित राहिला. हा सामना जिंकून इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.
आम्ही आणखी ३०-४० धावा केल्या असत्या…
सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली,
‘आम्हाला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळायचे आहे, परंतु दुर्दैवाने आमचे काही फलंदाज चेंडूचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत. याशिवाय इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनी आम्हाला मोकळेपणाने खेळू दिले नाही. ती पुढे म्हणाला, ‘आम्ही 30-40 अधिक धावा केल्या असत्या तर खूप फरक पडला असता, पण मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही.
हेदर नाइट ने ही विजयानंतर केले मोठे वक्तव्य..
दोन्ही संघांमधील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने या विजयानंतर सांगितले की, तिचा संघ क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणाली,
‘आमच्या सलामीवीरांसाठी धावा करणे सोपे नव्हते आणि रेणुका सिंगने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे आणि विकेट न गमावणे हे आमचे ध्येय होते. यानंतर आम्हाला एक कसोटी सामना खेळायचा आहे आणि त्याआधी आम्हाला ही मालिका 3-0 ने जिंकायची आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..