IND vs AUS: जसप्रीत बुमराह,रोहित,विराट परतणार तर, ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंची होणार संघातून सुट्टी, तिसऱ्या एकदिवशीय सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील 3 वनडे मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळवला जाणार आहे. बुधवारी दुपारी 1.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अशा प्रकारे केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंदोर वनडेमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र तो राजकोटमध्ये संघात सामील होणार आहे.जसप्रीत बुमराह राजकोट वनडेत खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना होणार.
याशिवाय भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे तिसर्या एकदिवसीय सामन्यात सहभागी होणार नाहीत. भारतीय क्रिकेट संघाचे हे 2 खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना होणार आहेत.
रुतुराज गायकवाड संघाचा कर्णधार आहे, तर मुकेश कुमार देखील भारतीय संघाचा एक भाग आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमारला बोलावण्यात आले होते.
ऋतुराज गायकवाडने मोहालीत शानदार खेळी केली.
ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली वनडेत ७७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. मात्र, या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाड लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. इंदोर येथील वनडेमध्ये ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाहेर पडला. रुतुराज गायकवाडला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने बाद केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना जिंकून भारतीय संघ ऑस्ट्रोलियाला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे ऑस्ट्रोलियाचा संघ हा सामना जिंकून आपले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करेल..
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल.