IND vs AUS फायनल U19 विश्वचषक: U19 विश्व चषक स्पर्धेमध्ये काल ऑस्ट्रोलिया संघाने टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारतीय संघाला वर्षभरात तिसऱ्यांदा निराशेचा सामना करावा लागला आहे . विशेष म्हणजे तिन्ही वेळा ऑस्ट्रेलिया समोर होता. दोनदा भारतीय वरिष्ठ संघाने निराशा केली आणि आता एकदा अंडर-19 विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. म्हणजे एकंदरीतच ऑस्ट्रेलियाने भारताला एका वर्षात तीनदा पराभूत करून तीन मोठी विजेतेपदे जिंकण्यापासून रोखले आहे.
19 नोव्हेंबर 2023 चा दिवस क्वचितच कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकेल, रोहित शर्माचे ते ओले डोळे, विराट कोहलीचा दुःखी चेहरा कोणत्याही चाहत्याच्या हृदयातून गेला नव्हता. आता 11 फेब्रुवारीला युवा टीम इंडियाने पुन्हा त्या क्षणाची आठवण करून दिली.
वर्षभरात तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी गमावली,प्रत्येक वेळी ऑस्ट्रोलियाने केला पराभव..
अंडर-19 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये, उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाने 79 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला. सहाव्यांदा हे जेतेपद पटकावण्यापासून टीम इंडिया हुकली. भारताची ही 9वी फायनल होती पण टीमला सहावा विजय नोंदवता आला नाही आणि चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अंडर-19 विश्वचषकात पराभूत होणारा उदय सहारन भारताचा चौथा कर्णधार ठरला. या पराभवाने वर्षभरात तिसऱ्यांदा चाहत्यांची मने दुखावली आहेत.
WTC ते 19 वर्षाखालील विश्वचषक,3मोठ्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रोलिया पडली भारी..!
जून 2023 मध्ये, केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. तिथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया निराश होऊन परतली. त्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी, एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत अपराजित असलेल्या टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत केले आणि सहावा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून चौथे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 1988, 2002 आणि 2010 मध्ये चॅम्पियन बनला होता.
U19 संघाच्या पराभवाने रोहित शर्माच्या संघाची आठवण झाली.
या विश्वचषकाच्या पराभवाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्माच्या संघाची आठवण करून दिली जी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली होती. तो ऐतिहासिक संघ क्वचितच कोणी विसरू शकणार आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंतचे सर्व सामने जिंकले होते पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे हे स्वप्न भंगले. अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये असेच काहीसे घडले होते, जेव्हा उदय सहारनच्या नेतृत्वाखाली संघ शेवटपर्यंत अजिंक्य होता पण ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठून अपेक्षांचा भंग केला.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.