IND vs ENG Rajkot Test Pitch Report: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे. पाच वर्षांनंतर राजकोटमध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला जात आहे. याआधी येथे भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
आता पुन्हा एकदा भारतीय संघ राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी पाच वर्षांनंतर राजकोटच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेऊया राजकोटच्या मैदानाचा पीच रिपोर्ट, हवामान रिपोर्ट आणि इतर माहिती..
The Rajkot pitch for the 3rd Test Match between India vs England. pic.twitter.com/4JAty2t0w4
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 14, 2024
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यातील पहिले दोन दिवस फलंदाजांच्या नावावर असतील. त्यानंतर ३, ४ आणि ५ व्या दिवशी फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येईल. मात्र, सामना सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी फलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळत राहणार आहे. यावेळी राजकोटची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करू शकते, असे मानले जात आहे. जिथे पहिले दोन दिवस खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असणार आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंशिवाय वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
राजकोट पिच रेकॉर्ड (Rajkot Stadium Pitch Report)
आतापर्यंत राजकोटमध्ये फक्त 2 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये एक कसोटी सामना भारताने जिंकला आणि एक कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. राजकोटमध्ये सर्वात कमी धावसंख्या 181 धावा आहे जी वेस्ट इंडिजने 2018 मध्ये भारताविरुद्ध केली होती. याच सामन्यात भारताने केलेली सर्वोच्च धावसंख्या ६४९/९ होती. 2018 मध्ये झालेल्या सामन्यात भारताकडून विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली होती. तर कुलदीप यादवने दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले होते. ज्याच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि २७२ धावांनी पराभव केला.
2016 मध्ये याच मैदानावर रंगला होता भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) कसोटी सामना.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2016 मध्ये राजकोट येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 537 धावा केल्या होत्या. यादरम्यान जो रूटने 124, बेन स्टोक्सने 128 आणि मोईन अलीने 117 धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडच्या 537 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 488 धावा करता आल्या.
भारताकडून मुरली विजयने 117 आणि चेतेश्वर पुजाराने 124 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने २६० धावांवर डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताला पाचव्या दिवशी 7 विकेट्सवर 172 धावा करता आल्या. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता तब्बल 8वर्षाने पुन्हा हे दोन्ही संघ त्याचा मैदानावर आमने सामने येणार आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.