क्रीडा

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..


ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि हा रोमांचक सामना 4 विकेटने जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने शेवटच्या षटकात 4 विकेट्स राखून जिंकले. दोन्ही संघांमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला आणि त्यानेही मोठं वक्तव्य केलं.

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सामन्याचा हिरो विराट कोहली भावूक होता.

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ४ विकेट्सने सामना जिंकल्यानंतर एक भावनिक वक्तव्य केले आहे. सामना जिंकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती हे त्याने सांगितले. रोहित शर्मा म्हणाला,

“मी ड्रेसिंग रूममध्ये होतो. माझ्याकडे शब्द नाहीत. अशा खेळात तुमच्याकडून अशी काही अपेक्षा असते. आम्हाला जास्तीत जास्त वेळ खेळात राहायचे होते.विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यातील ती महत्त्वपूर्ण भागीदारी आमच्यासाठी खेळ बदलणारा क्षण होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात खेळपट्टीचा पुढे उल्लेख केला. त्याने सांगितले की, खेळपट्टी चांगली होती. स्विंग आणि सीम देखील होते. त्याचबरोबर त्याने पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांचेही कौतुक केले.

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “ते दोघेही चांगले कॅरी करत होते . शिवाय गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कुणीही पहिले तर सगळे कौतुकच करतील.  त्यानंतर त्यांनी (इफ्तिखार आणि मसूद) चांगली भागीदारी केली. त्यांनी शेवटपर्यंत चांगली फलंदाजीही केली. पण त्याचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल हे आम्हाला माहीत होते.”

विराट कोहली
रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. खासकरून त्याने विराटच्या नाबाद 82 धावांना सलाम केला आहे. या सामन्यात कोहली चालला नाही तर टीम इंडियाचा पराभव निश्चित होता. पण त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळून भारताला सामना जिंकून दिला आणि त्याला ‘चेस मास्टर’ का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

हिटमॅन (रोहित शर्मा) म्हणाला की, ते दोन खेळाडू (कोहली आणि पंड्या) अनुभवी आहेत. आजच्या परिस्थितीत शांत राहणे आणि खेळ खोलवर नेणे आमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाचे होते. आम्ही सामना जिंकण्याच्या स्थितीत नव्हतो. आम्ही ज्या प्रकारे जिंकलो ते आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे. विराटने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याला सलाम, भारतासाठी खेळलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो, हे पाहणे आश्चर्यकारक आहे. आम्ही कुठेही गेलो तरी चाहत्यांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा, 99 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारे भारतीय खेळाडू, यादीमध्ये सहभागी आहेत भारताचे दिग्गज खेळाडू! केजीफ फेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीचे सुंदर फोटोशूट, फोटो पाहून चाहतेही झाले मोहित..
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,