आपल्या देशात क्रिकेट चे लाखो करोडो चाहते आहे. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी क्रिकेट नसला तरी आपल्या देशात सर्वाधिक पसंती क्रिकेट खेळाला दिली जाते.
या वेळी भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्मा च्या नियंत्रणाखाली इंग्लंड संघाबरोबर 5 टेस्ट मॅचेस सिरीज खेळली जात आहे. भारतीय संघाचे खराब प्रदर्शन असल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचे दार ठोठवावे लागले आहेत.
हैदराबाद कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव:-
सुरू असलेल्या हैदराबाद कसोटी मध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता तरी सुद्धा भारतीय संघ पराभवाच्या जाळ्यात अडकला आहे. परंतु इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टॉक याच्या नियंत्रणाखाली इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 28 धावा नी पराभव केला. आक्रमक फलंदाजी करत अगदी सहजपणे इंग्लंड संघाने भारतीय क्रिकेट संघाचा बाजार उठवला.
खराब फलंदाजी मुळे भारताचा पराभव:-
भारताची क्रिकेट संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी एकदम जोरदार आहे हे सर्वांना माहीत आहे. शिवाय भारतीय क्रिकेट संघ हा सामना जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 231 धावांची आवश्यकता होती. भारतीय क्रिकेट संघाचे ओपनार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही फलंदाजाच्या अवघ्या 15 धावांवर विकेट पडल्या. तसेच भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गील सुद्धा 0 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघ अवघ्या 202 धावांवर ऑल आऊट झाला.
या खेळाडूची खरी गरज:-
भारतीय क्रिकेट संघात जर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत हे 3 दिग्गज खेळाडू असते तर भारतीय संघाला हा सामना जिंकणे शक्य झाले असते.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्क ! टेस्ट क्रिकेट चा किंग आश्विन भारतीय संघाबाहेर…