- Advertisement -

भारतीय संघाने सामना तर जिंकला, मात्र झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद..

0 0

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना २९ जानेवारी रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला मात्र भारतीय संघाच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

टी -२० क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांचा खेळ. मात्र न्यूझीलंड विरुध्द झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघातील एकही खेळाडूला षटकार मारता आला नाहीये. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद ९९ धावा केल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला २० षटक अखेर १०० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.५ षटक अखेर ४ गडी बाद १०१ धावा करत सामना जिंकला.

भारतीय संघ

मुख्य बाब म्हणजे या १०० धावा एकही षटकार न मारता केल्या गेल्या. टी -२० क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच एकही षटकार मारला नाहीये. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगला २ गडी बाद करण्यात यश आले. यासह हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुदंर, युझवेंद्र चहल, दीपक हुड्डा आणि कुलदीप यादव यांना १-१ गडी बाद करण्यात यश आले. न्यूझीलंड संघासाठी कर्णधार मिचेल सॅंटनरने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली.

हे ही वाचा.. 

संपूर्ण सामन्यात एकही खेळाडू मारू शकला नाही षटकार, तर न्यूझीलंडचा आजपर्यंतचा सर्वांत कमी स्कोर.. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात झाले हे 11विक्रम..

VIRAL VIDEO: विश्वचषक ट्रॉफी हातात येताच कर्णधार ‘शेफाली वर्मा’ झाली भावूक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave A Reply

Your email address will not be published.