गेल्या 14 वर्षापासून देशात T20 आयपीएल चे सामने खेळले जात आहेत. आयपीएल मुळे सर्वात मोठा बदल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर झाला आहे. त्यामुळे आजकाल बहुतांशी सर्वच देशात T20 क्रिकेट चे सामने खेळले जात आहेत. कोणत्याही संघाला यशस्वी आणि विजयी करण्यासाठी संघात चांगल्या खेळाडूंची तसेच एका चांगल्या कर्णधाराची आवश्यकता असते. जर संघात चांगला कर्णधार नसेल तर संघाचा कधीच विजय होत नाही.
गेल्या 14 वर्षा पासून चेन्नई सुपर किंग हा संघ सर्वात यशस्वी संघ समजला जातो. त्यानंतर मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स या संघाने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा आयपीएल चे विजेतेपद जिंकले आहे त्यानंतर चेन्नई सुपर किंग या संघाने दोन्ही संघाचे कर्णधार हे उत्कृष्ट आहेत.
तर मग मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांना अत्यंत घाईघाने मध्ये संघाचा कर्णधार म्हणून बनवण्यात आले होते. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
करुण नायर:-
करुण नायर ने भारतीय क्रिकेट संघात टेस्ट क्रिकेट मध्ये तीन शतके झळकावली आहेत. 2017 साली करुण नायर दिल्ली या क्रिकेट संघाचे कर्णधार बनला होता. त्या वेळी त्या संघाचे कर्णधार झहीर खान होते परंतु दुखापत झाली असल्यामुळे झहीर खान ला संघात खेळता आले न्हवते त्यामुळे घाईघाने मध्ये करुण नायर ला कर्णधार बनवले होते.
जेम्स होप्स:-
2011 साली दिल्ली डेयरडेविल्स संघाचे कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता. एकूण 11 सामन्यापैकी अवघे 4 सामने जिंकता आले. नंतर एका दुखापतीमुळे वीरेंद्र सेहवाग ला संघातून बाहेर उपचारासाठी जावे लागले. त्यानंतर ऑस्त्रलिया संघाचा ऑल राऊंडर खेळाडू जेम्स होप्स ला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
पार्थिव पटेल:-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकिपर म्हणून पार्थिव पटेल ला ओळखले जाते. 2011 साली आयपीएल मध्ये पार्थिव पटेल ला कोची टस्कर्स या संघाचा कर्णधार बनवले होते. त्यावेळी संघात अनेक दिग्गज खेळाडू होते तरी सुद्धा पार्थिव पटेल ला कर्णधार बनवले होते.
भुवनेश्वर कुमार:-
2019 साली आयपीएल मध्ये सनराइज हैद्राबाद संघाचा कर्णधार केन विल्यम्सन आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार होता. परंतु 2019 च्या सुरुवातीला केन विल्यम्सन ला दुखापत झाल्यामुळे भुवनेश्वर कुमार ला टीम व्यवस्थापणाच काम दिले होते. भुवनेश्वर कुमार ने त्याच्या नियंत्रणाखाली 2 वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले.
मुरली विजय:-
2016 साली किंग एलेवन पंजाब संघाचा कर्णधार डेव्हिड मिलर होता. परंतु संघाने डेव्हिड मिलर चे कर्णधार पद काढून मुरली विजय ला दिले. मुरली विजय ने 3 वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
IND vs ENG: आरारर.. खतरनाक! हा रेकॉर्ड बनवून आर अश्विन ठरला जगातील एकमेव खेळाडू आहे, वाचा सविस्तर.
हे ही वाचा:-WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.