येणाऱ्या पुढील महिन्यापासून आयपीएल चे 15 व्या वर्षात पदार्पण होत आहे. तसेच आयपीएल मुळे भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये मोठा बदल घडून आलेला आहे. त्यामुळे आता जगभरात T20 क्रिकेट चे सामने खेळवले जात आहेत. आयपीएल च्या इतिहासात सर्वात जास्त विजेतेपद हे मुंबई इंडियन्स या संघाने जिंकले आहे.
तसेच रोहित शर्मा च्या कर्णधार पदाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या 5 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडून दुसऱ्या संघात कर्णधार बनले आहे.
दिनेश कार्तिक:-
भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू दिनेश कार्तिक, सध्याच्या IPL मधील सर्वोत्तम फिनिशर आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. दिनेश कार्तिक ने 2013 साली IPL दरम्यान मुंबई इंडियन्स संघामध्ये सामील झाला. 2013 च्या IPL नंतर, दिनेश कार्तिक ने मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडला आणि त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि RCB या संघात सामील झाला या वेळी दिनेश कार्तिक ला दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधारही केले होते.
अजिंक्य रहाणे:-
आतापर्यंत अजिंक्य रहाणे वेगवेगळ्या संघासाठी खेळले आहेत. सुरुवातीस अजिंक्य रहाणे 3 वर्ष मुंबई इंडियन्स या संघासाठी खेळाला त्यानंतर अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स या संघात गेले तिथे कर्णधार पद सुद्धा मिळाले त्यानंतर अजिंक्य रहाणे ने चेन्नई सुपर किंग संघात सामील झाला.
ग्लेन मॅक्सवेल:-
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा ऑल राऊंडर खेळाडू म्हणून ग्लेन मॅक्सवेल ला ओळखले जाते. 2013 साली ग्लेन मॅक्सवेल मुंबई इंडियन्स संघात होते त्यानंतर ते किंग 11 पंजाब मधे गेले आणि कर्णधार सुद्धा झाले.
हार्दिक पांड्या:-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार् फलंदाज तसेच आयपीएल चे ऑल राऊंडर खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या ला ओळखले जाते. हार्दिक पांड्या च्या नियंत्रणाखाली 2022 साली गुजरात टायटन संघाने विजेतेपद मिळविले. तसेच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख खेळाडू सुद्धा होता.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- IND vs ENG: आरारर.. खतरनाक! हा रेकॉर्ड बनवून आर अश्विन ठरला जगातील एकमेव खेळाडू आहे, वाचा सविस्तर.
हे ही वाचा:- WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.