मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका यांच्यात यांच्यात सामना रंगणार आहे. भारत हा सामना जिंकून सेमी फायनलचे तिकीट पक्के करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे श्रीलंकेने हा सामना गमावला तर त्यांचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद होतील. या सामन्यात अनेक विक्रम घडण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कामगिरीवर साऱ्यांची नजर असेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला आणखीन एक विक्रम मोडण्याची संधी आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोन करत त्याने दोन सामन्यात नऊ विकेट घेत दमदार कामगिरी केली. मोहम्मद शमीला विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळताना सर्वाधिक विकेट घेण्याची संधी आहे. विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने 13 सामन्यात 40 विकेट घेतले आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळताना जहीर खानने 23 सामन्यात 44 तर जवागल श्रीनाथ याने 34 सामन्यात 44 विकेट घेतले आहेत.
आजच्या सामन्यात शमीने जर 5 गडी बाद केले तर तो या दोघांनाही पाठीमागे टाकू शकतो. तसेच त्याला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप टेन मध्ये येऊ शकतो. सध्या तो या यादीत अकराव्या स्थानावर आहे. मोहम्मद शमी सध्या कमालीच्या फार्मात आहे. त्याचा हा परफॉर्मन्स पुढेही चालू राहिला तर तो या सर्वांच्या पुढे जाऊ शकतो.
रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या चार सामन्यात मोहम्मद शमीला डावलले होते. तो चारही सामने बेंचवर बसून पाहत होता. शार्दुल ठाकूरचा परफॉर्मन्स चांगला झाला नसल्याने त्याला संघाबाहेर बसून शमीला स्थान देण्यात आले. त्या गोष्टीचा राग मनात धरत धारदार गोलंदाजी करत सर्वांना चक्रावून सोडले. शमीला भारतीय संघात पहिल्या सामन्यापासून स्थान देण्यात आले असते तर कदाचित तो आता सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत टॉप वर राहिला असता.
दोन सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने रोहित शर्मा आता त्याला बेंचवर बसवण्याचे धाडस करणार नाही. तसेच सेमी फायनल आणि फायनलचे दोन महत्त्वपूर्ण सामने असल्याने शमी सारख्या गोलंदाजांना बेंचवर बसवणे हे भारतीय संघाला परवडण्यासारखे नाही. भारतीय संघ बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग करण्यासाठी शमीला वगळत होता. इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाने अत्यंत लो टोटल स्कोर दिला होता. इंग्लंडचे फलंदाज हा स्कोर सहज चेंस करू शकले असते, मात्र शमी भारतीय संघाच्या मदतीला धावून येत चार महत्त्वपूर्ण गडी बाद करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.