हार्दिक पांड्या : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानला जाणारा मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
यासह संघातून रोहित शर्मा युगाचा अंत झाला आहे. या बदलाची घोषणा करताना, मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स, महेला जयवर्धने म्हणाले की, हा बदल वारसा मजबूत करण्याचा आणि मुंबई इंडियन्सच्या भविष्याची तयारी करण्याचा एक भाग आहे.
सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे. त्याने संघाला झटपट यश मिळवून देण्यातच हातभार लावला नाही तर भविष्यात बळकट करण्यावरही भर दिला आहे. या तत्वज्ञानानुसार हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे.
Hardik Pandya announced as captain for the IPL 2024 season.
Read more➡️https://t.co/vGbcv9HeYq pic.twitter.com/SvZiIaDnxw
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
Mumbai Indian’s New Captain: गेल्या दोन हंगामात गुजरातचा कर्णधार म्हणून पंड्याने केलीय उत्कृष्ट कामगिरी
हार्दिकने गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. गुजरातने पदार्पणाच्या मोसमातच हार्दिकच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला होता. तर दुसऱ्या सत्रात अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास झाला. याआधी तो फक्त मुंबई इंडियन्सचा भाग होता. आणि आता या वेळी पुन्हा मुंबईने त्याला गुजरातमधून त्यांच्या संघात घेतले होते. पंड्याने अलिकडच्या वर्षांत आपल्या आक्रमक फलंदाजी, धारदार गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले आहे. तो T20 क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक मानला जातो.
To new beginnings. Good luck, #CaptainPandya 💙 pic.twitter.com/qRH9ABz1PY
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार मुंबई इंडियन्स.
हे लक्षात घेता भविष्यात तो मुंबई इंडियन्सला आणखी यश मिळवून देईल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असो, हा बदल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी रोमांचक आहे. रोहित शर्माच्या रूपाने यशस्वी कर्णधार गेल्याने युवा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाचा नवा अध्याय सुरू होत आहे. सध्या रोहित शर्माच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी एक खेळाडू म्हणून तो मुंबई इंडियन्सशी जोडला जाईल असे मानले जात आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघात मुंबई इंडियन्सची गणना केली जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यासह मुंबईने प्लेऑफचे 10 वेळा तिकीट बुक केले आहे. या संघाने 2013 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले होते. यानंतर संघाने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपदावर कब्जा केला आहे.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…