World Cup News: भारतात सध्या 2023 (World Cup 2023) विश्वचषक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार? याकडे साऱ्या जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट प्रेमी आणि विश्लेषक भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला असला तरी, भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या आता पोटात दुखायला लागले आहे.
विश्वचषक (World Cup 2023) सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचे माजी खेळाडू क्रिकेट प्रेमी आणि पत्रकारांनी भारताविरोधी अपप्रचार सुरू केला होता. पाकिस्तानने भारतात विश्वचषक खेळायला जाऊ नये असे तिथले पत्रकार आणि माजी खेळाडू यांनी पाकिस्तान संघाला चुकीचा सल्ला यापूर्वी दिला होता. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ मोठा ताकतीने मैदानात उतरला असून खेळात सरस कामगिरी करून प्रतिस्पर्ध्यांचा डाव हाणून पाडत आहे.
भारतीय संघाची ही कामगिरी पाहून, पाकिस्तानी मीडियाने संघाविरोधी अपप्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानच्या पत्रकारांनी आता थेट आयसीसीलाच धारेवर धरले आहे. भारताला विश्वविजेता (World Cup Winner) बनवण्यासाठी आयसीसी चाल खेळत असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानच्या पत्रकारांनी केला आहे. पाकिस्तान मधील प्रसिद्ध जीओ टीव्ही चॅनलचे प्रसिद्ध पत्रकार आरफा फिरोज यांनी आयसीवर आपल्या ट्विटर हँडल वरून टीकास्त्र सोडले आहे. फिरोज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.
World Cup2023: पाकिस्तान च्या पत्रकाराने आयसीसीवर लावले गंभीर आरोप, चौकशी करण्याची मागणी.
‘आरफा फिरोज’ यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून लिहिले की,
“दिल्लीच्या खेळपट्टीवर जाणून बुजून हिरवे गवत सोडले. कारण की, अफगाणिस्तानकडे उत्तम दर्जाचे फिरकीपटू आहेत. त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ नये असा डाव होता.चेन्नईची खेळपट्टी ही नेहमीच फिरकीपटूंना साथ देते, मात्र येथील खेळपट्टी ही फ्रेंडली बनवण्यात आली. कारण ऑस्ट्रेलियाकडे उत्तम दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत.एकंदरीतच भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी आयसीसी अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.”
केवळ पाकिस्तानी पत्रकार आणि माजी खेळाडूंनी भारतावर आणि आयसीसीवर टीका केली असे नाही तर यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य अध्यक्ष जका अश्रफ यांनी देखील भारताविरोधी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी भारत हा पाकिस्तानचा दुश्मन असल्याचे खुलेआमपणे बोलले होते.
भारत आणि पाकिस्तान (Ind vs pak) या दोन्हीही देशाचे क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्मत आहेत. दोन्ही संघांना विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाने विश्वचषकात विजयाने आपली सुरुवात केली आहे. पण आतापर्यंत झालेल्या विश्वचषकात World Cup भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानवर वरचढ ठरलेला आहे.
विश्वचषका दोन्ही संघ आतापर्यंत एकमेकांविरुद्ध सात वेळा भिडले आहेत. प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली आहे. पाकिस्तान अद्याप भारताविरुद्ध विश्वचषकात विजयाचे दार उघडले नाही. विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ जोरदार तयारी करत आहे. अहमदाबादचे उद्याचे मैदान कोण मारणार याकडे जगभरातील क्रीडा प्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..