2024 लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नुकतेच तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण याला उमेदवारी दिली आहे. युसुफ पठाण आता तृणमूल काँग्रेसकडून बहरामपूर येथून लोकसभा निवडणूक लढणार आहे. 2007 टी20 विश्वचषक स्पर्धा आणि 2011चा वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य आहे.
युसुफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक.
युसुफ पठाण हा गुजरात येथील बडोद्याचा रहिवासी आहे. या निवडणुकीमध्ये आता त्याला काँग्रेसचा उमेदवार अधीर रंजन चौधरी यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची कारकिर्द फार छोटीशी राहिली आहे. त्याने भारतीय संघाकडून 57 वनडे आणि 22 टी20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. युसूफ पठाणने 57 वनडे सामन्यांमध्ये 810 धावा तर, टी 20 मध्ये 236 धावा केल्या आहेत. अष्टपैलू असलेल्या या खेळाडूने वनडे मध्ये 33 तर t20 मध्ये 13 बळी घेतले होते. 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
पठाणची आयपीएलमधील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल चषक जिंकला होता. त्यावेळी तो त्या विजेत्या संघाचा सदस्य होता. तसेच केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचा चषक जिंकला होता. त्या विजेत्या संघाचा सदस्य आहे.
हरभजन सिंग सुद्धा आजमावणार राजकारणात नशीब.
‘टर्बनेटर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने राजकारणात प्रवेश केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आम आदमी पार्टीमध्ये 2022 मध्ये पदार्पण केले होते. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने 2019 मध्ये बीजेपीत प्रवेश केला. गेल्या पाच वर्षापासून ते लोकसभेचे खासदार म्हणून काम पाहत आहेत. नुकतेच गौतम गंभीर यांनी राजकारणामधून निवृत्ती स्वीकारली आहे. क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गौतम गंभीर, हरभजन सिंग, युसुफ पठाण हे तीन भारतीय खेळाडू 2011 मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. क्रिकेटनंतर त्यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही खेळाडूंनी भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाचे सदस्य होते.
2011 क्रिकेट विश्वचषक संघातील खेळाडू व्यतिरिक्त आतापर्यंत अनेक खेळाडू राजकारणाकडे वळले आहेत. यामध्ये कीर्ती आझाद (टीएमसी), मोहम्मद अझरुद्दीन (काँग्रेस), नवज्योत सिंग सिद्धू (काँग्रेस), मन्सूर अली खान ‘टायगर’ पतौडी (विशाल हरियाणा पार्टी), मनोज तिवारी (टीएमसी), चेतन चौहान (भाजप), मोहम्मद कैफ (काँग्रेस), श्रीशांत (भाजप), अशोक दिंडा (भाजप) आणि विनोद कांबळी (लोक भारती पार्टी) यांनी आत्तापर्यंत राजकारणामध्ये आपले नशीब आजमावले होते.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.
IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर