IND vs SL: श्रीलंकेवर मोठ्या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाखूष, सामना संपल्यावर केले मोठे वक्तव्य…
विश्वचषक 2023 मध्ये काल (२ नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळल्या गेल्या. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करतांना श्रीलंकेच्या गोलंदाजांची कुटाई करत शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 357 धावा केल्या.
प्रत्युतरात भारताच्या 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव 55 धावांत आटोपला. टीम इंडियाने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. यासह भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात सलग सातवा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक केले.
IND vs SL सामन्यानंतर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य..
सामना झाल्याननंतर पोस्ट प्रेझेन्टेशन मध्ये बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,
“आम्ही अधिकृतपणे सेमीफायनल साठी पात्र झालो आहोत हे जाणून खूप आनंद झाला, आम्ही चेन्नईमध्ये सुरुवात केली तेव्हा संघाकडून हा चांगला प्रयत्न होता. आमचे लक्ष्य प्रथम पात्रता मिळवणे आणि नंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठणे हे होते, आम्ही ज्या प्रकारे हे 7 सामने पाहिले ते खूपच आश्चर्यकारक होते.”
रोहित पुढे म्हणाला,
“ इथपर्यंत पोहचण्यासाठी संघातील प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत. बोर्डवर धावा टाकणे हे एक चांगले आव्हान होते आणि जेव्हा तुम्हाला इतक्या धावा करायच्या असतील तेव्हा तुमच्याकडे एक समान टेम्पलेट असणे आवश्यक आहे. “कोणत्याही खेळपट्टीवर 350 ही खूप चांगली धावसंख्या असते आणि आम्हाला त्या धावसंख्येपर्यंत नेण्याचे बरेच श्रेय फलंदाजीला जाते आणि गोलंदाजांनी नक्कीच चांगले काम केले आहे.”
, “श्रेयस (अय्यर) खूप मजबूत खेळाडू आहे आणि आज त्याने त्याच्याकडून अपेक्षित असलेली खेळी केली. त्याने दाखवून दिले की तो त्याच्यासमोरचे आव्हान पेलण्यास तयार आहे आणि (मोहम्मद) सिराज हा आमच्यासाठी आणखी एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि जर त्याने तसे केले (नवीन चेंडूसह कामगिरी) तर आमच्यासाठी गोष्टी वेगळ्या दिसतात.
(सिराज) नवीन चेंडूने गोलंदाजी करत आहे, त्याच्याकडे खूप कौशल्य आहे. अगदी सूर्याने (कुमार यादव) गेल्या सामन्याच्या शेवटी आम्हाला काही महत्त्वाच्या धावा दिल्या.
“एकंदरीत, ‘गोलंदाज चमकदार गोलंदाजी करत आहेत’ हे पाहणे आनंददायी होते आणि मला आशा आहे की ते असेच चालू ठेवतील. मी निर्णय गोलंदाज आणि यष्टिरक्षकावर (डीआरएस घ्यायचा की नाही) वर सोडला आहे आणि मला विश्वास ठेवता येईल असे लोक शोधायचे आहेत आणि मला माहित आहे की ते इतर मार्गाने देखील जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबद्दल काय म्हणाला रोहित शर्मा?
दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगले क्रिकेट खेळत आहेत आणि आम्हीही. तेथील लोकांसाठी हा एक उत्तम सामना असेल आणि कोलकात्यातील लोक त्या खेळाचा आनंद घेतील.” विश्वचषकातील टीम इंडियाचा पुढील सामना 5 नोव्हेंबरला कोलकत्ताच्या इडन गार्डन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. दोन्हीही संघात सध्या टेबल टोपर बनण्यसाठी जोरदार शर्यत सुरु आहे. त्यामुळे हा सामना नक्कीच रोमांचक होणार, यात काहीही शंका नाही..
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी