“कर्णधार करनार असणार तरच..” मुंबई इंडियन्समध्ये येण्याआधीच हार्दिक पांड्याने घातल्या होत्या मालकाला आय अटी, स्वतः संघाच्या मालकाने केला खुलासा.
हार्दिक पांड्या: मुंबई इंडियन्सने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पुढील आयपीएल हंगामासाठी (IPL 2024) आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) मध्ये MI संघाची जबाबदारी स्वीकारेल. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी सोशल मीडियावर याची घोषणा केली.
मुंब ई इंडियन्स (MI ) च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरून घोषणा होताच रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई आणि हार्दिक पंड्याला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई इंडियन्समध्ये परतण्यासाठी हार्दिक पांड्याने अट ठेवली होती की, त्याला एमआयचा कर्णधार बनवले तरच तो संघात परतेल. एका मोठ्या वृत्तपत्राने हा दावा केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पांड्याने एमआय मालकांना स्पष्ट केले की, जर फ्रँचायझीला त्याला संघात परत हवे असेल तर तो संघाचे नेतृत्व करेल. यानंतर फ्रँचायझी व्यवस्थापनाने हार्दिकची इच्छा मान्य केली.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने गेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी केली. दोन्ही वेळा त्याने अंतिम फेरी गाठली. गुजरातने 2022 च्या पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
यानंतर त्याला पुढील आवृत्तीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हार्दिकचे नेतृत्व गुण पाहून मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा आपल्या संघाचा भाग बनवले. आता रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.
उल्लेखनीय आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (MI) संघाने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2016, 2017, 2019, 2020 मध्ये विजेतेपद पटकावले.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…