क्रीडा

गेल्या 10 सामन्यात ठोकलेत 8 शतके, तरीही या युवा खेळाडूला नाही मिळाले बांग्लादेशविरुद्धच्या संघात स्थान, बीसीसीआयचं होतंय दुर्लक्ष..

गेल्या 10 सामन्यात् ठोकलेत 8 शतके तरीही या युवा खेळाडूला नाही मिळाले बांग्लादेशविरुद्धच्या संघात स्थान, बीसीसीआयचं होतंय दुर्लक्ष..


देशांतर्गत क्रिकेटमुळे भारतीय संघासाठी नवीन युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी खूप मोठे व्यासपीठ मिळते. विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये, एकापेक्षा जास्त खेळाडू त्यांच्या सामना जिंकण्याच्या कामगिरीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. द्विशतक किंवा एकहाती संघाला विजय मिळवून देणे असो, या यादीत ज्या खेळाडूचे नाव अग्रस्थानी दिसते ते म्हणजे ऋतुराज गायकवाड .

टीम इंडियाच्या या  25 वर्षीय सलामीवीराने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करत भारतीय संघासाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे.

महाराष्ट्रासाठी या संपूर्ण स्पर्धेत रुतुराज गायकवाडची बॅट पेटलेली दिसत आहे. आज  रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात रुतुराजने 131 चेंडूत 108 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या कालावधीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकारही मारले आहेत. दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत असतानाही ऋतुराज गायकवाडने संयमी फलंदाजी करत संघ कसा हाताळला जातो हे दाखवून दिले.

सलामीवीर म्हणून आलेल्या ऋतुराज गायकवाडने सामन्यात संघाची धावगती अबाधित ठेवली आहे. रुतुराजच्या या खेळीमुळे संघाची धावसंख्या 248 वर पोहोचली आहे. ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाची खेळी खेळली नसती तर सामन्याची कहाणी वेगळी असती.

गेल्या 10 सामन्यात 8 शतके झळकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात संधी मिळत नाही.

विजय हजारे ट्रॉफी 2022 मधील सर्व सामने खेळण्याची संधी ऋतुराज गायकवाडला मिळाली नाही, मात्र केवळ 5 सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाडने तुफानी फलंदाजी केली आहे. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने रेल्वेविरुद्ध 124* धावांची खेळी केली. त्याच उत्तर प्रदेशसाठी, त्याने 220* धावांची धडाकेबाज खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने एका षटकात 7 षटकार मारण्याचा पराक्रमही दाखवला.

ऋतुराज गायकवाडनेही विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आसामविरुद्ध 168 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. अशा परिस्थितीत 168, 220*, 40, 124*, 168, 21, 124, 154*, 136 धावांच्या शेवटच्या 10 डावांबद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात संधी न मिळणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. .?

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

या कारणामुळे गायकवाड  राहतोय भारतीय संघातून बाहेर..!

ऋतुराज गायकवाडने गेल्या 10 सामन्यात 8 शतके झळकावली आहेत, पण त्यामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळत नाही त्यामागे काही कारणे सुद्धा आहेत.

ऋतुराज गायकवाडची देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी असूनही त्याला भारतीय संघात फार कमी संधी मिळाल्या आहेत. 2021 मध्ये T20 आणि 2022 मध्ये ODI मध्ये पदार्पण केल्यानंतर, ऋतुराज गायकवाड फक्त 9 T20 आणि 1 ODI खेळण्यात यशस्वी ठरला. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड मालिका आणि आगामी बांगलादेश दौऱ्यातही ऋतुराजला संधी देण्यात आलेली नाही.

खेळाडू

झटपट धावा करूनही संघात निवड न होण्याचे मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची मुबलकता. रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, शुभमन गिल यांसारख्या नियमित सलामीवीरांव्यतिरिक्त, टीममध्ये इशान किशन, पृथ्वी शॉ देखील पर्याय आहे.

यासोबतच कर्णधार रोहितने ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनाही सलामीवीर फलंदाजीची जबाबदारी दिली आहे. अशा स्थितीत भारतीय संघासाठी ऋतुराजच्या रूपाने प्रतिभावान खेळाडू असूनही त्याची संघात निवड होणे फार कठीण आहे.


हेही वाचा:

क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,