- Advertisement -

हा खेळाडू बनेल टीम इंडियाचा नवा विराट कोहली, दिनेश कार्तिकने केला मोठा खुलासा…

0 0

हा खेळाडू बनेल टीम इंडियाचा नवा विराट कोहली, दिनेश कार्तिकने केला मोठा खुलासा…


भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकदिवशीय सिरीज सध्या संपली असून अंतिम सामन्यात भारताने बांग्लादेशला पराभूत केले आणि आपली इज्जत वाचवली. या एकदिवशीय सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाचे अनेक स्टार खेळाडू आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाही. तर दुसरीकडे नवखे खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वत्र चर्चेंचा विषय बनले.

अश्याच खेळाडूपैकी एक म्हणजे टीम इंडियाचा युवा खेळाडू ‘श्रेयस अय्यर’  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा टीम इंडियाची बोट बुडत असल्याचे दिसत होते, तेव्हा या खेळाडूने आपल्या जबाबदारीची धुरा सांभाळत स्वत:ला सिद्ध केले, ज्यासाठी दिनेश कार्तिकनेही त्याचे कौतुक केल.

श्रेयस अय्यरने आपल्या सर्वोत्तम कामगिरीने टीम इंडियाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यरने आपली खेळी जबाबदारीने खेळली आणि दुसऱ्या सामन्यात 80.39 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “माझ्या मते, श्रेयस अय्यर ज्या प्रकारे सातत्यपूर्ण खेळला आहे तो विलक्षण आहे. या वर्षी त्याने 700 हून अधिक धावा केल्या आहेत आणि तो किती आत्मविश्वासात आहे हे तुम्ही पाहू शकता. तो सुरुवातीला काही चेंडू घेतो, पण नंतर आक्रमक शॉट्स खेळण्यास सुरुवात करतो.”

या एपिसोडमध्ये पुढे जोडताना, कार्तिक म्हणाला, “तो फिरकीपटूंना खूप चांगले खेळतो आणि चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा गोलंदाज निश्चितपणे शॉर्ट बॉल टाकून त्याची परीक्षा घेतात, पण तो नेहमीच चांगला खेळ करतो. मात्र, विराट कोहलीसारखे मोठे नाव कमवायचे असेल तर नाबाद १२०-१३० धावा कराव्या लागतील आणि संघाला सामना जिंकावा लागेल.

 

गेल्या अनेक सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक माजी खेळाडूंकडून त्याची प्रशंसा झाली आहे आणि त्याच्या संघाची सुरुवातीची भिंत कोसळली असतानाही त्याने आपल्या बहुतेक सामन्यांमध्ये खेळपट्टीवर स्वतःला सिद्ध केले आहे. आत्तापर्यंत अय्यरने (श्रेयस अय्यर) त्याच्या कारकिर्दीत 38 सामन्यांत 1534 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीसह 422 धावा केल्या आहेत.

अनेक माजी खेळाडूंच्या स्तुतीवरून हे स्पष्ट होते की त्यांचे मनोधैर्य खूप उंचावले असेल आणि त्यांच्या फलंदाजीची धार आणखी तीक्ष्ण असेल, आता त्यांची कामगिरी ते लोकांच्या आणि निवडकर्त्यांच्या विश्वासाला धरून आहेत की नाही हेच सांगेल.


हेही वाचा:

ईशान किशन पाठोपाठ विराट कोहलीनेही ठोकले ताबडतोब शतक, 44 व्या शतकासाठी विराट कोहलीने मोडले हे मोठे विक्रम..

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Leave A Reply

Your email address will not be published.