- Advertisement -

इंदोरमध्ये टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी…! रोहित शर्माची पलटण 141 वर्ष जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर, फक्त करावे लागतील हे 2 काम..

0 0

इंदोरमध्ये टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी…! रोहित शर्माची पलटण 141 वर्ष जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर, फक्त करावे लागतील हे 2 काम..


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया खूपच कमकुवत स्थितीत दिसत आहे. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाचा दुसरा डाव 163 धावांत सर्वबाद झाला. 75 धावांची आघाडी घेत संघाने विरोधी संघाला 76 धावांचे लक्ष्य दिले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने 100 पेक्षा कमी धावांचे लक्ष्य देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे 141 वर्षांपूर्वी, इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी 85 धावांचा बचाव केला होता. टीम इंडियासाठी विजय मिळवणे आता जवळजवळ अशक्य आहे, परंतु त्यांनी तसे केल्यास इतिहास रचला जाईल.

टीम इंडिया

टीम इंडिया 141 वर्षे जुना रेकॉर्ड मोडू शकते.

टीम इंडियाने इंदूर कसोटीत ७६ धावांनी विजय मिळवला तर भारतीय संघ कसोटी क्रिकेटचा एक अनोखा विक्रम मोडेल. वास्तविक, कसोटी क्रिकेटमध्ये 141 वर्षांपूर्वी म्हणजेच 1882 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या डावात एकूण 85 धावा वाचवल्या होत्या. आता इंदूर कसोटीत टीम इंडिया एकूण 75 धावांचा बचाव करून क्रिकेटच्या इतिहासात मोठा विक्रम रचू शकते.

आतापर्यंतचे सामन्याचे हाल.

1 मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघ पहिल्या डावात केवळ 109 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९७ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 163 धावांवर आटोपला.

Ind vs Aus, 3rd Test | India stares at defeat at the end of day 2 - The  Hindu

अशाप्रकारे टीम इंडियाने 75 धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य दिले. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या दुसऱ्या आणि चौथ्या डावात फलंदाजीसाठी उतरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे तिकीट मिळविण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेतील 3 सामने जिंकणे आवश्यक आहे.


हे ही वाचा..

रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..

उद्यापासून सुरु होतेय भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील तिसरा कसोटी, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू, तर हे खेळाडू करू शकतात तुम्हाला मालामाल..

आयपीएल 2023 साठी जसप्रीत बूमराहच्या जागी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 गोलंदाजाना देऊ शकते संधी, एकजण तर आहे अत्यंत घातक गोलंदाज..

Leave A Reply

Your email address will not be published.