क्रिकेट आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु सर्वात जास्त वेड हे क्रिकेट खेळाचे आहे. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीने ने केलेल्या आक्रमक फलंदाजी बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. जगभरात विराट कोहली चे असंख्य फॅन्स सुद्धा आहेत. तसेच विराट कोहली ने सचिन तेंडुलकर ची सुद्धा अनेक रेकॉर्ड तोडली आहेत.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये सिरीज क्रिकेट चा सामना खेळला गेला होता. या सिरीज मध्ये तिसरी टीम मेजबान ऑस्ट्रेलिया सुद्धा होती. होबार्ट येथे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघात सामना झाला आणि दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरी जिंकण्यासाठी दोन्ही संघात लढत सुरू होती.
श्रीलंका संघाने या सामन्यात 40 ओव्हर मध्ये 320 धावा बनवून भारतीय क्रिकेट संघापुढे चॅलेंज ठेवले होते. फलंदाजी साठी उतरलेले सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग या दोन्ही खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप केली. परंतु या नंतर फलंदाजी करण्यासाठी आला विराट कोहली.
मैदानात आल्यावर विराट कोहली ने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहली ने 86 चेंडू मध्ये 133 धावा केल्या. या सामन्यात 16 चौकार आणि 2 षटकार मारून श्रीलंका संघाची चांगलीच जिरवली होती. त्यामुळे विराट कोहली ने अवघ्या 34 ओव्हर मध्ये टार्गेट पूर्ण करून फायनल मध्ये भारतीय संघाचे स्थान निश्चित केले.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- यशस्वी जैसवालने सेहवागचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला, विराट आणि द्रविड ला मागे टाकणारा पहिला खेळाडू ठरला.