Virat Kohli Update: भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. भारताने विश्वचषक गमावल्यानंतर विराट कोहलीने क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे, मात्र विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो या मालिकेचा भाग नाही.
आता विराट कोहलीने चाहत्यांना आणखी एक धक्का दिला आहे. कोहलीने बीसीसीआयला सांगितले की, त्याला सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून दूर राहायचे आहे. त्याला सध्या एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळायचे नाहीत.
विराट सध्या पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणार नाही
पुढील महिन्यात भारत दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका असणार आहे. मात्र टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, विराट कोहली सध्या पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणार नाही, यावरून हे स्पष्ट झाले आहे की दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेत विराट कोहली संघाचा भाग असणार नाही. याशिवाय विराटने असेही सांगितले की तो लाल बॉल क्रिकेट खेळत राहणार आहे, यावरून हे देखील स्पष्ट झाले आहे की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग असेल.
Virat Kohli टी-२० विश्वचषक खेळणार?
विराट कोहलीने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून दुरावल्यानंतर चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की ,विराट कोहली पुढच्या वर्षी होणारा टी-२० विश्वचषक खेळणार नाही का? याबाबत विराटने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आता टी-20 विश्वचषकाबाबतही विराट आपली भूमिका स्पष्ट करेल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. याशिवाय रोहित शर्माच्या वक्तव्याचीही चाहते वाट पाहत आहेत की, रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकाही खेळणार की नाही. यावर रोहितकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र हे दोन्ही खेळाडू टी-२० विश्व चषक खेळतील अशी आशा त्यांचा चाहत्यांना आहे.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..