विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले.
विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले.
भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी करत विजयाचा चौकार लावला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत भारताने आठ गुणांची कमाई केली आहे.
न्यूझीलंडचे गोलंदाज 2003 पासून नेहमीच भारतीय फलंदाजावर हावी झाले आहेत. 2003 पासून भारत एकदाही न्यूझीलंडला विश्वचषकामध्ये पराभूत करू शकला नाहीये.