RCB new Captain for IPL 2025: आज होणार आरसीबीच्या नवीन कर्णधाराची घोषणा, पहा कोण कोण शर्यतीत? किती वाजता होणार घोषणा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RCB new Captain for IPL 2025: जर तुम्हीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्व आरसीबी चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. आज म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी संघ आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल.

IPL 2025 RCB New Captain: विराट कोहलीच होणार आरसीबीचा नवा कर्णधार? संघाच्या CEO ने केला मोठा खुलासा..

आयपीएल २०२५ साठी आरसीबी कोणता खेळाडू संघाची धुरा सोपवेल हे पाहणे खूप मनोरंजक असेल. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात  मागच्या वर्षी देखील त्यांना  पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे. या संघाने दोन हंगामात निश्चितच अंतिम फेरी गाठली आहे मात्र एकदाही ते विजेतेपद पटकावू शकले नाहीयेत.

 कधी होणार आरसीबीच्या नवीन कर्णधाराची घोषणा? ( when will rcb announced new captain for ipl 2025?)

आरसीबी संघ आज भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल. संघ स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर त्यांच्या नवीन कर्णधाराबद्दल( rcb captain reveal ipl 2025) माहिती देईल. काही वृत्तांत असे आले होते की, विराट कोहली पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळू शकतो. मात्र विराट कोहलीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्यास रस दाखवलेला नाही.

कोण होऊ शकते आरसीबीचा नवा कर्णधार ? (who will be RCB new Captain for IPL 2025?)

Sports Wordz च्या  एका वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) रजत पाटीदार किंवा कृणाल पंड्या यांच्यापैकी एकाला कर्णधारपद सोपवण्याची योजना आखत आहे. कृणालला कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. त्याने आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आहे. यासोबतच, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाचे सतत नेतृत्व करत आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशचे नेतृत्व करताना, रजतने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाचे नेतृत्व केले.

IPL 2025 RCB New Captain: विराट कोहलीच होणार आरसीबीचा नवा कर्णधार? संघाच्या CEO ने केला मोठा खुलासा..

rcb captain reveal ipl 2025

कर्णधारपदाची जबाबदारी असूनही, रजतच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली आणि त्याने ९ डावांमध्ये ४२८ धावा केल्या. रजतने गेल्या दोन हंगामात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच संघाने त्याला मेगा लिलावापूर्वी कायम ठेवले.

आयपीएल २०२४ मध्ये, आरसीबी एलिमिनेटरपर्यंत पोहोचला होता. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली, एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करून संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. विराटची बॅट जोरात बोलली आणि त्याने १५ सामन्यांमध्ये ७४१ धावा केल्या.


हेही वाचा:

Actress Ananya Pandey Crush: ना रियान पराग ना रोहित…! हा खेळाडू आहे अभिनेत्री अनन्या पांडेचा क्रश, स्वतः केला मोठा खुलासा…

Leave a Comment