Yuzvendra Chahal Dhanshree Verma Divorce: टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी एकमेकांना घटस्फोट दिला आहे. बऱ्याच काळापासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते.
चहल आणि धनश्री यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दल अटकळ सुरू झाली होती. मात्र आता त्याला ऑफिशियल रित्या मंजुरी मिळाली आहे आणि दोघेही कायदेशीर रित्या वेगळे झाले आहेत.
Yuzvendra Chahal Dhanshree Verma Divorce: चहल-धनश्री कायदेशीररित्या वेगळे झाले?
PinkVilla च्या वृत्तानुसार, एबीपी न्यूजने या प्रकरणाशी संबंधित वकिलाचा हवाला देत आपल्या वृत्तात लिहिले होते की, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची सुनावणी वांद्रे फॅमिली कोर्टात झाली. या काळात, न्यायाधीशांनी दोघांनाही समुपदेशन सत्रासाठी विचारले होते परंतु समुपदेशन सत्र देखील त्यांचा घटस्फोट थांबवू शकले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी चहल आणि धनश्रीच्या संमतीने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
न्यायालयात घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान चहल आणि धनश्री वर्मा यांनी सांगितले की, ते दोघेही १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. दरम्यान, दोघांच्याही अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत होते.
घटस्फोटाचे कारण काय आहे?
चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाचे कारणही समोर आले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की दोघांमध्ये पटत नाही. ज्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता चहल आणि धनश्री कायदेशीररित्या पती-पत्नी नाहीत.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी २०२० मध्ये एकमेकांशी लग्न केले होते, परंतु आता ४ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही गुरुग्राममध्ये काही जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केले होते.
हेही वाचा:
या एका कारणामुळे 54 वर्षापूर्वी सरकारने देव आनंद यांच्या ‘दम मारो दम’ गाण्यावर बंदी आणली होती…
5 दिवसांमध्ये 5 सरकारी नोकरी मिळवून ‘या’ मुलीने देशभरात नाव कमावलय..