महेंद्रसिंग धोनी: आज आम्ही अशा काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, महेंद्रसिंग धोनीमुळे त्यांचे करिअर संपले.हे खेळाडू प्रसिद्धीपासून दूर अज्ञाताचे जीवन जगत आहेत. क्रिकेटला आपलं करिअर बनवणारे हे खेळाडू क्रिकेटच्या ग्लॅमरमध्ये अशा प्रकारे हरवून गेले की ते कधीच प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. आज आम्ही अशाच काही जुन्या क्रिकेटर्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांना तुम्ही विसरला असाल. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
या 7 भारतीय खेळाडूंचे करिअर महेंद्रसिंग धोनिमुळे संपले.
समीर दिघे:
08 ऑक्टोबर 1968 रोजी मुंबईत जन्मलेल्या क्रिकेटपटू समीर दिघेने 18 मार्च 2001 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले. 10 जानेवारी 2000 रोजी त्याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 5 ऑगस्ट 2001 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. समीरने त्याच्या कारकिर्दीत एकूण 6 कसोटी आणि 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. समीरची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ९४ धावांची होती. यष्टिरक्षक समीर दिघेने आपल्या कारकिर्दीत 19 झेल घेतले आणि 5 स्टंपिंग केले होते .
त्याकाळी भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचा दबदबा होता. आणि समीर दिघे सुद्धा त्याच काळात भारतीय संघात आल्यामुळे धोनीच्या जागी त्याला भारतीय संघात कमी संधी मिळाल्या. याचे परिणाम असे झाले की, त्याची कारकीर्द अतिशय छोटी बनून राहिली. जर त्या वेळेत धोनी संघात नसता तर कदाचित निवडकर्त्यांनी समीर दिघेला आणखी जास्त संधी दिली असती.
दीप दास गुप्ता
बंगालचा यष्टिरक्षक दीपदास गुप्ताला कोण विसरू शकेल. दीपदास गुप्ताने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त पाच वनडे आणि आठ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांचा जन्म 07 जून 1977 रोजी पूर्णिया, बिहार येथे झाला. दीपदासची कारकीर्द केवळ एक वर्ष टिकली. 2001 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्याने करिअरची सुरुवात केली. दीपदास गुप्ता यांची पहिली प्रशिक्षक एक महिला होती, तिचे नाव सुनीता शर्मा आहे. सुनीता या देशातील पहिल्या महिला प्रशिक्षक आहेत. दीपदासनंतर अजय रात्राने संघात प्रवेश केला, पण तुफानी फलंदाज महेंद्रसिंग धोनीने संघात प्रवेश केल्याने दोघांची कारकीर्द फ्लॉप झाली.
अजय रात्रा
या यादीत समीर हा एकमेव क्रिकेटपटू नाही जो धोनीच्या चांगल्या खेळामुळे दुर्लक्षित झला असाच एक खेळाडू म्हणजे ‘अजय रात्रा’. 13 डिसेंबर 1981 रोजी हरियाणातील फरिदाबाद येथे जन्मलेला क्रिकेटपटू अजय रात्र देखील आजकाल अज्ञाताचे जीवन जगत आहे. 19 एप्रिल 2002 रोजी, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. याच सामन्यात अजयनेही शानदार शतक झळकावले. पण एवढे करूनही तो टीम इंडियातून बाहेर पडला. पण संघाबाहेर असण्याचे कारण दुखापत आणि फिटनेस हे होते. नंतर तो संघात परतला पण फार काळ टिकला नाही. कारण तोपर्यंत धोनी युग सुरू झाले होते.
पार्थिव पटेल
पार्थिव पटेलचा भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून प्रवेश झाला. मात्र धोनीच्या आगमनानंतर पार्थिव क्रिकेट जगतातून गायब झाला. पार्थिव पटेल यांचा जन्म 09 मार्च 1085 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. पार्थिव पटेलने आतापर्यंत केवळ 25 कसोटी सामने खेळले आहेत. पण त्याच दरम्यान धोनीचा संघात प्रवेश झाला आणि पार्थिव पटेलच्या नशिबाला ग्रहण लागले. तेव्हापासून आतापर्यंत तो संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता मात्र शेवटी त्याला निवृत्ती जाहीर करावी लागली.
दिनेश कार्तिक
तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 1 जून 1985 रोजी जन्मलेल्या विकेटकीपर दिनेश कार्तिकची धोनीच्या पदार्पणामुळेच त्याची कारकीर्द घसरली. धोनीच्या झंझावातासमोर दिनेश कार्तिकला संघात विशेष संधी मिळाली नाही. वयाच्या १७ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकची २००४ मध्ये भारतीय संघात नियमित यष्टिरक्षक म्हणून निवड झाली होती. मात्र, 2005 मध्ये महेंद्रसिंग धोनी टीम इंडियात सामील झाल्यानंतर त्याला वगळण्यात आले. कार्तिकने आतापर्यंत केवळ 79 सामने खेळले आहेत.
नमन ओझा
नमन ओझा यांचा जन्म 20 जुलै 1083 रोजी मध्य प्रदेशातील धार्मिक शहर उज्जैन येथे झाला. नमन ओझाला वनडेतील पहिला सामना खेळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर, त्याने 28 ऑगस्ट 2015 रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामनाही खेळला. धोनीचे संघात पुनरागमन झाल्यानंतर नमन आता दुसऱ्या संधीसाठी आसुसलेला आहे.
गौतम गंभीर
सलामीवीर गौतम गंभीरला परिचयाची गरज नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात त्याच्या चाहत्यांची कमतरता नाही. महेंद्रसिंग धोनीच्या आधी गौतम गंभीरने भारतीय संघात पदार्पण केले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली गंभीरला फारशी संधी मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडत आहे.
गंभीरच्या जागी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले. 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये गौतम गंभीरने चमकदार कामगिरी केली आणि 97 धावांची खेळी केली, ज्यामुळे भारत विश्वविजेता बनला.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता