क्रीडा

के एल राहूल ला मिळणार डच्चू त्याच्या जागी हा खेळाडू करू शकतो डावाची सुरवात, तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा संघ, स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..

के एल राहूल ला मिळणार डच्चू त्याच्या जागी हा खेळाडू करू शकतो डावाची सुरवात, तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा संघ, स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेत भारताने (TEAM INDIA) कांगारूंवर वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आरामशीर आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. दुसरीकडे, कांगारू संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने पाहुण्या संघाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. यानंतर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सनी तुडवले. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या एपिसोडमध्ये तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या लेखाद्वारे आम्ही इंदूरमध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा करणार आहोत. यापैकी एक नाव असे आहे की, त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सलामीवीर म्हणून राहुलची जागा धोक्यात..

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. हा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. जर भारताने हा सामना जिंकला तर, ते मालिकेत 3-0 ने आघाडीवर असतील. पण, संघाचा उजवा हात सलामीवीर केएल राहुल या संपूर्ण मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे, ही संघासाठी चिंतेची बाब आहे.

या मालिकेतील तीन डावात त्याला आपल्या फलंदाजीच्या जोरावर केवळ 36 धावा करता आल्या आहेत. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात जोडीदार बदलणार आहे. तो नव्या जोडीदारासोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. रोहितसोबत फॉर्मात असलेला शुभमन गिल या सामन्यात सलामी जोडीला सुरुवात करणार आहे.

मधल्या फळीत दोन मोठे बदल होण्याची शक्यता..

चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून खेळताना दिसू शकतो. त्याचवेळी विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमारला संधी दिली जाऊ शकते.

भारतीय संघ

याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला दोन्ही सामन्यात संघासाठी विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला तिन्ही डावांत एकदाही अर्धशतक करता आले नाही. त्याच वेळी, त्याच्या जागी इशान किशनला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

कांगारूंवरील या मालिकेत भारतीय संघ जरीअद्याप हावी दिसत असला तरीही उर्वरित दोन सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रोलियाला कमी लेखणार नाही. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने दोन सामन्यांच्या चार डावात एकूण 40 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजाचे सर्वात मोठे योगदान आहे. मात्र, अक्षर पटेल आपल्या गोलंदाजीने या सामन्यात फारशी छाप पाडू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या गोलंदाजी युनिटमध्ये जास्त बदल होतील असं वाटत नाही.


हेही वाचा:

सतत फ्लॉप होऊनही के.एल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!

दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रोलीया संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘या कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स परतला मायदेशी..!

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज


व्हिडीओ प्लेलीस्ट:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,