हा आहे क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत ‘इमानदार खेळाडू’, तब्बल एवढ्या वेळा अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता स्वत सोडले होते मैदान..
हा आहे क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत इमानदार खेळाडू, तब्बल एवढ्या वेळा अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता स्वत सोडले होते मैदान..
क्रिकेटच्या जगात नेहमीच विक्रम मोडण्याची प्रक्रिया असते, पण या सगळ्यात काही विक्रम असे बनतात जे संपूर्ण करिअरमध्येही मोडणे सोपे नसते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच एका विक्रमाबद्दल सांगणार आहोत. क्रिकेटमध्ये अंपायरने चुकीचा निर्णय देणे, अंपायरने आऊट दिल्यानंतरही बॅट्समनचा निषेध, अशा अनेक घटना तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. याशिवाय, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अंपायर आऊट करण्यापूर्वी किंवा नॉट आऊट झाल्यानंतरही फलंदाज स्वत:ला आऊट करून पॅव्हेलियनच्या दिशेने जातात.
आजचा हा लेख सुद्धा अश्याच एका खेळडू बद्दल आहे. ज्याला आपण क्रिकेटमधील आजवरचा सर्वांत इमानदार खेळाडू देखील म्हणू शकतो. या खेळाडूने मैदानात फलंदाजी करतांना विरोधी संघांनी बाद ची अपील केल्यावर जर तो बाद असेल तर स्वतहून मैदान सोडून सोडले. त्यासाठी तो अंपायरच्या निर्णयाची वाट पाहत नसे.

बर त्याने हे काम एक दोन वेळा नाही तर , आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा केले आहे. हा खेळाडू दूसरा तिसरा कुणी नसून औस्ट्रोलियाचा माजी स्टार खेळडू ‘अॅडम गिलख्रिस्ट’आहे. होय. त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 12 वेळा अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता स्वत मैदान सोडले होते.
त्याच्या कारकिर्दीत असे काही प्रसंग आले की जेव्हा तो बाद आहे की नाही हे अंपायर सांगू शकत नव्हते आणि असे काही वेळा होते जेव्हा अंपायरने त्याला नाबाद घोषित केले, पण गिलख्रिस्ट स्वतःहून पॅव्हेलियनमध्ये गेला होता. कारण तो बाद आहे हे त्याला माहीत होते. नंतर रिप्ले पाहिल्यावर अंपायरने चुकीचा निर्णय दिला आणि गिलख्रिस्ट बाद झाल्याचे सर्वांना कळले होते.
ऑस्ट्रेलियन विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या कारकिर्दीत एकूण १२ वेळा ही घटना घडली आहे. म्हणजे तो स्वत: त्याच्या कारकिर्दीत 12 वेळा पॅव्हेलियनमध्ये जाऊन आऊट मागत होता. हा एक अतिशय अनोखा आणि मोठा विक्रम आहे. अॅडम गिलख्रिस्ट किती प्रामाणिक होता हे या रेकॉर्डवरून दिसून येते.
View this post on Instagram
अॅडम गिलख्रिस्ट या विक्रमाच्या यादीत भारतीय स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश येतो.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..