Uncategorized

IND vs AUS: अखेर रवींद्र जडेजाने नाथन लायनची इच्छा केली पूर्ण, केवळ 24 तासाकरिता केले असे काम…नाथन लायनची प्रतिक्रिया होतेय तुफान व्हायरल..

IND vs AUS: अखेर रवींद्र जडेजाने नाथन लायनची इच्छा केली पूर्ण, केवळ 24 तासाकरिता केले असे काम…


बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कसोटी सामने भारताने तिसऱ्या दिवशीच जिंकले आहेत. या सामन्यात फिरकीपटूंची जादू दिसून आली आहे. भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारताकडून रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनची फिरकी जबरदस्त चालली.

दोघांनी ऑस्ट्रेलिया निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला.आता मैदानाबाहेर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय खेळाडूंची हमरीतुमरी सुरु असल्याचं दिसून येत आहे. आता रविंद्र जडेजानं ऑस्ट्रेलियन खेळाडू नाथन लायनची फिरकी घेतली. रविंद्र जडेजा सोशल मीडियावर कोणालाही फॉलो करत नाही. त्यामुळे त्याला याबाबत वारंवार विचारलं जातं. या गोष्टीची री पकडून नाथन लायन दिल्ली टेस्टपूर्वी सांगितलं होतं की, रविंद्र जडेजा मला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. मी तुझ्या फॉलो करण्याची वाट पाहात आहे.तू मला फॉलो करशील का? असा प्रश्न देखील विचारला होता.

नाथन लायनच्या विनंतीचा रविंद्र जडेजाने मान ठेवला आहे. तसेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नाथन लायनला 24 तासांसाठी फॉलो केलं आहे. नाथन लायनला फॉलो करत असल्याची माहिती देखील त्याने स्वत:च दिली असून स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला आहे.

रविंद्र जडेजाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 22 षटकात 8 निर्धाव षटकं टाकत 47 धावा देत 5 गडी बाद केले होते. या डावात नाथन लायन नाबाद 0 या धावसंख्येवर होता. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने पहिल्या डावात 185 चेंडूत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने 12 षटकात 34 धावा देत 2 गडी बाद केले होते.

रवींद्र जडेजा

रविंद्र जडेजाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 21 षटकात 2 निर्धाव षटकं टाकत 68 धावा देत 3 गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करतानाा 74 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तर रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत धाडला. 12 षटकात 1 निर्धाव षटक टाकत 7 गडी बाद केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित

दोन कसोटी सामना विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार असंच चित्र दिसत आहे. आयससीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला ही कसोटी मालिका 3-0 ने जिंकायची आहे. भारतासाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे.


हेही वाचा:

सतत फ्लॉप होऊनही के.एल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!

दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रोलीया संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘या कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स परतला मायदेशी..!

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,