क्रीडा

मोहम्मद शमीच्या उत्तरामुळे शाहिद आफ्रिदीच्या **ला लागली मिर्ची, पाकिस्तान फायनल हरल्यावर शमीने केले होते ट्रोल..

मोहम्मद शमीच्या उत्तरामुळे शाहिद आफ्रिदीच्या **ला लागली मिर्ची, पाकिस्तान फायनल हरल्यावर शमीने केले होते ट्रोल..


बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला रविवारी इंग्लंड विरुद्ध T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने लक्ष्याचा पाठलाग करण्यापूर्वी पाकिस्तानला 20 षटकांत 8 बाद 137 धावांवर रोखले. संघाकडून शान मसूदने सर्वाधिक (38) धावा केल्या.

दुसरीकडे, इंग्लंडच्या विजयाचा नायक बेन स्टोक्स होता कारण त्याने 49 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. या विजयासह, इंग्लंड आता मर्यादित षटकांचे क्रिकेट चॅम्पियन बनले आहे कारण ते सध्या पन्नास षटकांच्या फॉर्मेटचे चॅम्पियन आहेत.

पाकिस्तानच्या पराभवानंतर संघाला खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ट्रोल केले होते. पाकिस्तानच्या पराभवानंतर अख्तरने ट्विटरवर ‘हार्टब्रोक’ इमोजी पोस्ट केला आहे. यानंतर शमीने त्या ट्वीटला उत्तर देतांना लिहले की, “सॉरी भाऊ, याला कर्म म्हणतात.”

शमीच्या या ट्विटला पाकिस्तानी मीडिया खूप ट्रोल करत आहे. नॅशनल न्यूज चॅनल समा टीव्हीने पोस्ट फायनल मॅच शोमध्ये याबद्दल चर्चा केली.शोमध्ये सहभागी झालेला शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आम्ही क्रिकेटर आहोत, आम्ही अॅम्बेसेडर आहोत, आम्ही रोल मॉडेल आहोत, हे सर्व संपवण्याचा प्रयत्न करायला हवा.

आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत. लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या अशा गोष्टी घडू नयेत. असे केले तर सामान्य माणसाकडून काय अपेक्षा ठेवायची. खेळाशी आमचे संबंध अधिक चांगले राहतील. आम्हाला त्यांच्यासोबत खेळायचे आहे, त्यांना पाकिस्तानात बघायचे आहे. शमीच्या ट्विटनंतर आफ्रिदीने त्याला आणखी एक सल्ला दिला.तो पुढे म्हणाला, “तुम्ही निवृत्त खेळाडू असलात तरी असे करू नये. पण तुम्ही सध्याच्या संघासोबत खेळत आहात, या सर्व गोष्टी टाळा.

 शाहिद आफ्रिदी

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली

दुसरीकडे, जर आपण भारतीय संघाबद्दल बोललो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ आता 18 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड दौऱ्यावर 3 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात T20 आंतरराष्ट्रीय मालिकेने होत आहे.

या मालिकेत संघाची कमान स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.


हेही वाचा:

या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..

पुरुषी वर्चस्वाच्या काळात विज्ञानासह भौतिक शास्त्रातसुद्धा सुद्धा या ‘महिला शास्त्रज्ञाने’ आपल्या कामगिरीने महिलांना आदर मिळवून दिला होता..

वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता के.एल. राहुलची भारतीय संघातून हकालपट्टी निच्छित, हे 3 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा..

फक्त कर्णधार होते म्हणून वर्ल्डकप 2022 खेळू शकले हे 3 कर्णधार, नाहीतर संघात ठेवण्याच्या ही नव्हते लायकीचे..

रिषभ- कार्तिक नाही तर हे दोन यष्टीरक्षक होते वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे खरे हकदार, बीसीसीआयने मुद्दाम केले नजरंदाज…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,