विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणारे ‘हे’ आहेत भारतीय कर्णधार,रोहित शर्माच्या तर नावावर झालाय सर्वांत मोठा विक्रम..

विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणारे 'हे' आहेत भारतीय कर्णधार,रोहित शर्माच्या तर नावावर झालाय सर्वांत मोठा विक्रम..

 

भारतीय कर्णधार: भारतीय क्रिकेट संघाला सौरव गांगुली याच्यानंतर यशस्वी कर्णधारांची परंपरा लाभली आहे. या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि आता रोहित शर्मा यांनी भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. विश्वचषकात देखील या खेळाडूंची आकडेवारी दमदार आहे. आज आपण विश्वचषकात या कर्णधारानी किती सलग सामन्यात विजय मिळवून दिला आहे याची माहिती पाहणार आहोत.

महेंद्रसिंग धोनी: 2011 आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरती होती. त्याने भारतीय संघाला सलग 11 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघ त्याच्याच नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला होता. धोनीने सलग 11 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून दिले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणारे 'हे' आहेत भारतीय कर्णधार,रोहित शर्माच्या तर नावावर झालाय सर्वांत मोठा विक्रम..

 सौरव गांगुली: 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान ही सौरव गांगुलीच्या खांद्यावर होती. दादाने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सलग आठ सामन्यात विजयी ठरला होता.

रोहित शर्मा : 2023 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने 9 पैकी 9 सामने जिंकून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा कर्णधार ठरला आहे.

 विराट कोहली: 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग 5 सामन्यात विजय मिळवला होता. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध खेळताना पराभव झाला होता.

IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

या पराभवाचा बदला भारतीय संघाने 2023 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत घेतला. भारतीय संघाला आणखीन विश्वचषक स्पर्धेत चार साखळी सामने खेळायचे आहे. भारताने सेमी फायनल आणि फायनल चा सामना खेळला तर रोहित शर्माला माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकते.

विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणारे 'हे' आहेत भारतीय कर्णधार,रोहित शर्माच्या तर नावावर झालाय सर्वांत मोठा विक्रम..

कपिल देव: 1983 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. नेतृत्वात अत्यंत कुशल असलेले कपिल देव यांनी भारतीय संघाला सलग पाच सामन्यात विजय मिळवून दिला होता. तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्टइंडीज संघाचा त्यांनी 36 धावांनी दारुण पराभव केला होता.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *